Posts

Showing posts from February, 2026

पंढरपूर ते पापरी बससेवा सुरू करण्याची करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Image
 पंढरपूर ते पापरी बस सेवेची  ग्रामस्थांकडून मागणी पंढरपूर प्रतिनिधी              मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातून पंढरपूरला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू असते यासाठी ग्रामस्थांनी बस सेवेची मागणी पंढरपूर आगर प्रमुखांकडे  केली आहे     गावातील शैक्षणिक कारणास्तव विद्यार्थी तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शेतकरी वर्ग व भाविक भक्त हे रोज पंढरपूरकडे ये जा करत असतात परंतु एसटीची गावातून सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे प्रामुख्याने गावातील शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते यासाठी गावातील तरुण वर्गाच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या मागणी पत्रासह ग्रामस्थांच्या सह्यांचे पत्र पंढरपूर आगार प्रमुखांकडे बस सेवा सुरू करण्याबाबत दिले आहे लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे यावेळी आगार प्रमुखांनी सांगितले यावेळी  छावा छात्रविर सेनेचे विजय कदम तसेच उद्योजक आशुतोष सुतार उपस्थित होते बस सेवा सुरू झाल्यास ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांची ये जा करण्यासाठी सुरक्षित सोय होणार आहे ...

कर्मयोगीतील "डिपेक्स २०२६"मधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना., स्पर्धा उत्साहात संपन्न.

Image
 कर्मयोगीतील “डिपेक्स २०२६” मधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना. सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.  पंढरपूर (प्रतिनिधी) अ. भा. वि. प. तसेच सृजन ट्रस्ट व श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डिपेक्स २०२६ ची आयडिया प्रेझेंटेशन सोलापूर विभाग स्तरीय स्पर्धा कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांना व्यासपीठ देणार्‍या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिपेक्ससारख्या उपक्रमातून देशाला भावी संशोधक तसेच उद्योगक मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ प्रयत्न करून नाही तर प्रत्यक्ष कृती केल्यावरच यश मिळते असा यशाचा कानमंत्र त्यांनी य...

व्हि बी ग्राम जी योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि मजुरांसाठी अधिक पारदर्शक.

Image
 व्हि बी ग्राम जी योजना ग्रामीण भागातील जनता आणि मजुरांसाठी अधिक पारदर्शक, पंढरपूर (प्रतिनिधी) लोकांसाठी सार्वजनिक धोरणांचे मूल्यांकन भावना, राजकीय स्मृती किंवा प्रतीकात्मकतेवर न करता त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांच्या आधारे केले गेले पाहिजे. मनरेगाच्या जागी विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम, 2025 (VB GRAM G) लागू झाल्यानंतर निर्माण झालेला विरोध अपेक्षितच होता. नव्या कायद्यावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की यामुळे रोजगाराचा हक्क कमकुवत होतो, राज्यांवर अतिरिक्त आर्थिक जबाबदारी येते, सत्तेचे केंद्रीकरण वाढते आणि महात्मा गांधींचा वारसा पुसला जातो. परंतु ही टीका प्रत्यक्ष धोरणातील त्रुटींवर कमी आणि राजकीय भूमिकांवर अधिक आधारित आहे. VB GRAM G हक्काधिष्ठित व्यवस्थेचा अंत करतो, हा आरोप एका चुकीच्या समजुतीवर उभा आहे—की कायद्यातील हक्क आपोआपच नागरिकांचे सक्षमीकरण करतात. मनरेगाचा जवळपास वीस वर्षांचा अनुभव ही समजूत अपुरी असल्याचे दाखवतो. वेळेवर मजुरी न मिळणे, मागणी असूनही काम न मिळणे, निकृष्ट दर्जाची कामे आणि राज्यागणिक असमान अंमलबजावणी यामुळे हा तथाकथित “हक्क” प्...

यंदाचे डिपेक्स २०२६चे प्रायोजकत्व कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे.

Image
 *यंदाचे डिपेक्स २०२६ च्या कल्पना सादरीकरण राऊंडचे  प्रायोजकत्व  कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे.   राज्यस्तरीय कल्पना सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना. पंढरपूर ( प्रतिनिधी)  श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या सामाजिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी डिपेक्स २०२६ चे कल्पना सादरीकरण स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. सदरची सोलापूर विभागस्तरीय स्पर्धा  ४ फेब्रुवारी २०२६ रोजी  कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पंढरपूर येथे पार पडणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली  या स्पर्धेची संकल्पना "ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोपक्रम" अशी असून, ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  सदरची स्पर्धा  "ग्रामीण भारताला सक्षम बनवणे, मुळांना नवोपक्रम देणे "या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत पदविका, पदवी व आयटीआयचे विद्यार्थी स...