नदी काठाच्या गावांचा वीज पुरवठा आजपासुन पूर्ववत ,_आ. समाधान आवताडे.


 *नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा आज सायंकाळपासून सुरळीत होणार- आ समाधान आवताडे

 पंढरपूर 

(प्रतिनिधी)

उजनी धरणातून सध्या पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले असून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता हे पाणी सध्या हिळळी बंधाऱ्यात पोहोचले असून तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी आज सायंकाळपासून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

सध्या नदीत पाणी असूनही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते,शेतात असलेली उभी पिके डोळ्यासमोर वीज नसल्याने जळून चालली होती,केवळ दोनच तास वीज पुरवठा सुरू असल्यामुळे शेतात पाणी येण्याअगोदर वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे नदीकाठचे शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्या संदर्भात वारंवार मागणी करत होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आज सोमवारी सायंकाळपासून वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.

संपादक

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.